तुम्हाला माहीत आहे का, हिमालयापासून ते इंदु सरोवरापर्यंत भारताची भुमी ही देव निर्मिती असल्याने तिला 'देवभुमी' असे म्हटले जाते.
हिमालयाच्या पोटात अनेक रहस्ये साठवलेली आहेत. त्यापैकी ज्ञानगंगा सिद्धाश्रम हे पण एक रहस्य आहे.
तुम्ही कधी याबाबत कुठे ऐकलय का हो? असेल तर मला नक्की सांगा.
असो, असे म्हणतात की, पृथ्वीवरील अनेक चिरंजीव लोक जसे हनुमान वगैरे हिमालयातील ह्या गुप्त शहरांत राहतात, अशी मान्यता आहे. फक्त प्रचंड ज्ञान प्राप्ती केलेल्या लोकांनाच इथे प्रवेश आहे. हे स्थान अश्या प्रकारे वसवले गेले आहे कि अगदी उपग्रहातून सुद्धा ते स्पष्ट दिसू शकत नाही.
तिबेट आणि भारतातील अनेक साधू भिक्षु लोकांनी प्राचीन ग्रंथात सिद्ध्लोकाबद्दल लिहून ठेवले आहे. काही जन आपला मृत्यू जवळ येताच तिथे निघून गेले आहेत.
हिमालयांत भ्रमण करणाऱ्या लोकांना अचानक कधी "यती" किंवा इतर "सिद्ध लोक" खूप वेळा दिसून येतात, पण नंतर त्यांचा शोध घेतल्यास ते सापडत नाहीत. कदाचित ते तिथेच राहत असावेत.
तिबेटी लोक याला "संभलची रहस्यमय भुमी" म्हणतात. त्यांच्या अनुभवा नुसार याच नेमकं ठिकाण कैलाश पर्वताच्या एका खिंडीत आहे.
हनुमाना शिवाय इथे वसिष्ठ, विश्वामित्र, भीष्म, कृपाचार्य, शंकराचार्य, कणाद, परशुराम इत्यादी विभूती ध्यान मग्न आहेत. सदर आश्रमाचे रक्षण व्हावे म्हणून ४ प्रकारचे जीव गस्ती वर असतात. "यती" शिवाय "अर्ध मानव आणि अर्ध पक्षी" प्रकारचे जीव सुद्धा या भागात आढळून आल्याचे सैन्यासह बरेच प्रत्यक्षदर्शी सांगतात.
एखादा मानव चुकुन तिथे पोचलाच तर त्याला त्या आश्रमात सर्व सुख सुविधा घेवून जीवन व्यतीत करावे लागते अशी सुरक्षा योजना आहे. दर रात्री अश्या मानवांची स्मरणशक्ती पुन्हा नवी होते आणि त्यांना वाटते कि ते आजच सिद्ध लोकांत पोहचले आहेत. शेकडो वर्षे पर्यंत हे मानव त्याच आश्रमात अडकून राहतात.
या अलौकीक आश्रमाचा उल्लेख चार वेदा शिवाय बऱ्याच पौराणिक ग्रंथात आढळतो. या सिद्धआश्रमाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या एक बाजूला अद्भुत कैलास पर्वत, दुसऱ्या बाजूला ब्रह्म सरोवर तर तिसऱ्या बाजुला विष्णुतीर्थ आहे. पौराणिक कथा नुसार हा आश्रम ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून स्वतः विश्वकर्मा यांनी याची रचना केली आहे. याबद्दल अजून पौराणिक माहिती अशी आहे की, श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, शंकराचार्य, माता आनंदमयी आणि सर्व देवी विभुती सह-देह येथे आजही वास्तव्य करीत आहेत.
एक अजुन रहस्यमय गोष्ट म्हणजे ज्ञानगुंज नावाचा एक धर्मोपदेश ग्रंथ आहे, तो आज पण हिमालयात एका गुप्त रहस्यमय जागेत ठेवलेला आहे. या जागेत महान योगी, साधु, ऋषी मुनी रहातात, असे म्हणतात. आपल्या धर्मा प्रमाणे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या पुजा - अर्चा, ध्यान, साधना केल्या जातात.
आध्यात्मिक ज्ञानाच्या ज्ञान गंगेत सिध्दाआश्रमाचे दिव्य रूप वर्णन केलेले आहे. साधु, सिद्ध योगी हे आपल्या दिव्य ज्ञानाने या ब्रह्मांडात भ्रमण करीत असतात, ते नेहमीच या ठिकाणी भेट देतात. सिध्दआश्रम हा आध्यात्मिक चैतन्य, दिव्यरुप, महान ऋषी मुनींची वैराग्य आणि पवित्रभुमी म्हणुन ओळखला जाते.
सिद्धाश्रम हा मानव, सर्व दृश्य आणि अदृश्य प्राणी मात्रा साठी एक अद्भुत , दुर्लभ आणि दिव्यभुमी आहे. असे असले तरी कठीण तपस्या करणारे ऋषी मुनी, योगी, साधु , संत आपल्या योग आणि साधनेच्या अदभुत शक्तिच्या जोरावर तेथे पोहचतात. सिद्धाश्रम म्हणजे ही हिमालयातील एक गुप्त आणि रहस्यमय भूमि आहे. या ठिकाणी महान सिद्ध योगी, साधु आणि संत यांचे वास्तव्य आहे.
या रहस्यमय आश्रमाचा उल्लेख रामायण, महाभारत, वेद, उपनिषद आणि पुराणा मध्ये आढळून येतो. ऋग्वेद, हा मानव सभ्यता आणि शिक्षणाचा सर्वात अगोदरचा वेद आहे.
सिद्धाश्रम हा सिद्ध योग्यांचे रहिवास स्थान आहे. ज्या सिद्ध पुरुषांना साधन शक्तीच्या ताकदीवर गुरुंचा गुरुपदेश आणि गुरुमंत्र मिळाला आहे, असे सिद्ध पुरुष या आश्रमात पोहचतात. आजही सिद्ध योगी, हट योगी, संन्यासी हजारों वर्षा पासून या ठिकाणी योग साधना आणि ध्यान करीत आहे.
सर्वात प्रथम स्वामी विशुद्धानंद परमहंस यांनी सार्वजनिकरीत्या या ठिकाणाची चर्चा केली. त्यांनी लहानपणापासूनच योग साधनेला सुरुवात केली होती. त्यांचा काही योग्याशी संपर्क झाला. त्यांच्या बरोबर ते ज्ञानगंज सिध्दआश्रमात पोहचले आणि ध्यान साधना केली.
अशी मान्यता आहे की महर्षि वशिष्ठ, विश्वामित्र, कणाद, पुलस्त्य, अत्रि, महायोगी गोरखनाथ, श्रीमद शंकराचार्य, भीष्म, कृपाचार्य हे युग पुरुष सह - देह येथे भ्रमण करीत असतात. जे कोणी हट योगी, ध्यान साधना करणारे योगी, योगिनी, अप्सरा हे सुध्दा या ठिकाणी आज पण ध्यान करीत आहे, अशी मान्यता आहे.
येथील बगीच्यामध्ये सुंदर रंगी बेरंगी फुले, फळे, झाडे, पक्षी, सिद्धयोगी तलाव, अशा अनेक अद्भुत गोष्टींचे वर्णन करायला शब्द कमी पडतात.
विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही काही प्रश्नांना उत्तर शोधू शकलेलं नाही. कैलास पर्वताचा एकूणच आकार, त्याचं वातावरण तसेच तिथे येत असलेले अनुभव हे सध्या तरी एक रहस्य आहे. कैलास पर्वताचा उल्लेख अगदी वेदांमध्येही केला गेला आहे. त्यातही कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्य असल्याचं म्हंटल गेलं आहे. हे शिखर तिबेट इथल्या मिलारेपा ह्या बौद्ध भिक्षूने ९०० वर्षापूर्वी सर केल्याचं बोललं जातं. व त्यांनीही पुन्हा ह्यावर चढाई केली जाऊ नये असं बोलल्याची आख्यायिका आहे.
१९८० ला चीन सरकारने प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहोल्ड मिसनेर ज्यांनी जगातील ८००० मीटर ( २६,००० फुट) पेक्षा जास्ती उंचीची सगळी म्हणजे १४ शिखर सर केली आहेत त्यांना कैलास पर्वतावर आरोहण करण्यासाठी बोलावलं होतं. पण त्याने ते निमंत्रण नाकारलं होतं.
कैलास पर्वताला भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे. असं म्हंटल जातं. अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते. यातील सत्यता जाणण्यासाठी आजवर बरेच जणांनी प्रयत्न केले.
२००१ साली चीन सरकारने एका स्वीडनच्या टीम ला ह्या पर्वतावर मोहीम आखण्यास परवानगी दिली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कैलास पर्वताचं पावित्र्य लक्षात घेता त्या दबावाखाली चीन सरकारला अश्या मोहिमांवर कायस्वरूपी बंदी आणावी लागली.
असा हा पवित्र, अदभूत कैलास पर्वत आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन आजही हिमालयात उभा आहे. कैलास पर्वताजवळ दोन जलाशय आहेत. मानसरोवर आणि दुसरा राक्षसतळं. जगातील सर्वाधिक उंचीवरचं मानसरोवर हे १५०६० फूट उंचीवर ४१० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं, ९० मीटर खोल असलेलं हे सरोवर गोल आहे. ह्यातून ब्रह्मपुत्रा, इंडूस, घगहारा ह्या नद्यांचा उगम होतो.
मानसरोवरचं पौराणिक महत्व खूप आहे. पण त्याच्या फक्त ३.७ किलोमीटर अंतरावर असलेलं राक्षसतळं मात्र ह्या पेक्षा पूर्णतः वेगळं आहे. राक्षसतळं हे रावणाने शंकराला प्रसन्न करताना बनवलं गेल्याची कथा आहे. त्यामुळे ह्याचं पाणी खारट आहे. ह्याच्या उत्तरेकडून सतलज नदीचा उगम होतो. दोन्ही जलाशय इतक्या जवळ असून पण ह्या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविविधतेत खूप वेगळेपणा आहे. राक्षसतळ्यात कोणत्याही जलचर आणि जल वनस्पतीचं अस्तित्व आढळून येत नाही. ह्याचे पाणी नेहमी अशांत असते. तर मानसरोवराच पाणी अतिशय शांत आहे. कितीही वारे वाहिले आणि हवेचा जोर असला तरी मानसरोवरा मधील पाणी नेहमीच शांत रहाते.
कैलास मानसरोवर यात्रा आजही अनेक खडतर यात्रांपेकी गणली जाते. ह्याचं कारण ह्याच्या आसपास न कोणता विमानतळ आहे, न रस्ते आहेत, न कोणतं बंदर आहे. इकडे जायचं असेल तर त्या निसर्गाला शरण जाऊन खडतर पायी प्रवास केल्यावरच ह्या अगम्य पर्वताचे दर्शन मानवाला होते.
क्रमश:
(हा भाग आवडल्यास ह्याला जास्तीतजास्त शेअर करा धन्यवाद.)
©preetisawantdalvi